Posts

तळे राखणारा संक्षिप्त असा लेख - हंसराज कांबळे

Image
तळे राखणारा.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जरी आपल्या मधून कायेने गेले असतील तरी पण त्यांनी लिहिलेली लिखित पुस्तके आणी खंड आपणा सर्वाना योग्य मार्गदर्शक आणी दिशादर्शक अशी आहेतच.  वैचारिक पुस्तकांबद्दल आणी स्वतः बद्दल ते काय म्हणतात ते पहा -  माझ्या विद्येचे वेड भयंकर आहे. ब्राह्मणाच्या घरी नाही इतकी पुस्तके आता दिल्लीला मजजवळ आहेत. एकूण 20,000 पुस्तके मजजवळ आहेत कुणाबरोबर दाखवून द्यावीत. एवढे जेव्हा पुस्तकावर प्रेम होईल तेव्हाच तो विद्येचा खरा पुजारी होईल. मी विद्येची पूजा 24 तास करतो *संदर्भ -* खंड. 18 भाग 3 पृष्ठ. क्रं. 403.   पुढे ते म्हणतात -  साधारणपणे पुस्तक वाचन व माझे काम या पलीकडे माझे मन दुसरे कशातही रमत नसल्यामुळे मी फारसा कोणत्याच कार्यक्रमात भाग घेत नाही *संदर्भ -* उपरोक्त. पृष्ठ. क्रं. 197.पैरा - 3.  उपरोक्त दोन्ही संदर्भानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विद्येचे किती व्यासंगी होते. म्हणूनच त्यांना आपण धर्मशास्त्रवेत्ता, घटनेचे शिल्पकार विद्येचा महामेरू आणी ज्ञानाचे प्रतीक या नावाने उपाधी लावून सर्वजण संबोधतो. त्यांनी एकदा आपल्या भाषणात बौद्धजणांना संबोधन म्हटले

अण्णा भाऊ साठे यांचे भाषण :  समकाळाच्या पार्श्वभूमीवर आकलन

Image
▪️दि. २ मार्च १९५८ रोजी दादर (मुंबई) येथील मोरबाग रोडवरील बंगाली हायस्कूलच्या सभागृहात पहिले दलित साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनाचे नियोजित उद्घाटक आचार्य प्र. के. अत्रे हे होते. मात्र काही कारणांमुळे अत्रे येऊ न शकल्यामुळे ऐनवेळी अण्णा भाऊ साठे यांना उद्घाटन करण्यासाठी विनंती करण्यात आली. अण्णा भाऊंनी संयोजकाची गैरसोय होऊ नये म्हणून उद्घाटक म्हणून येण्याचे कबूल केले. यावेळी उद्घाटक म्हणून अण्णा भाऊंनी जे भाषण केले, ते ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. अण्णा भाऊंचे उपलब्ध असलेले हे एकमेव छापील भाषण आहे. या संमेलनाला आणि भाषणाला अनेकार्थाने महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक अधिष्ठान ही दलित साहित्याची एक महत्त्वाची बाजू आहे. दलितांच्या सांस्कृतिक सत्तेसाठी डॉ. आंबेडकरांनी भक्कम अशी पार्श्वभूमी तयार करून ठेवल्यामुळेच दलितांच्या सामाजिक विषमतेचा इतिहास नोंदवला गेला. सामाजिक पुनर्रचना हे या साहित्याचे ध्येय आहे. म्हणूनच भाषेसह अनेक पारंपरिक बाबींना नाकारून दलित लेखकांनी स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी नवा मार्ग निवडला आणि बहिष्कृत, वंचित समाजाची वेदना त्यांनी साहित्यात मांडल

ग्रुप मध्ये राहण्यासाठी काही नियम व अटी

Image
नमो बुद्धाय्..! जय भीम 🔵 सदर गृप हा बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर संविधानाच्या चौकटीत राहून तयार करण्यात आला आहे. भीम आर्मी भारत एकता मिशन प्रमुख भाई चंद्रशेखर आझाद यांच्या सामाजिक लढाई मध्ये सामिल असून अन्याय विरोधात आवाज उठवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. 📚🔴⚫🔴⚫📚🔵🔵🔴📚🔴⚫🔴⚫📚 १)  गृपमध्ये विनाकारन चँट करु नये. २)  कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याचा विचार करावा. ३)  गृपच्या नावाशी आणि प्रोफाईल फोटोशी कोणीही छेडछाड करु नये. ४)  गृपमध्ये कोणाच्याही कामी येणारी माहीती व एखाद्या आवश्यक विषयावर चर्चा करावी तसेच एकाच विषयावर नेहमी नेहमी गृपमध्ये जास्त वेळी बोलू नये. ५)  जर कोनालाही टाकलेल्या पोस्ट बद्दल तक्रार असेल तर त्याने गृप अॅडमिन सोबत (व्यक्तीगत संदेश) पर्सनल चँट करावी. ६)  एकदा केलेली पोस्ट दुसऱ्यांदा करु नये. ७)  एकच पोस्ट / फोटो पुन्हा पुन्हा टाकल्यास ग्रूप मधून रिमुव्ह ( कमी )करण्यात येईल. ८)  कुठल्याही प्रकारच्या धर्माशी अथवा राजकारनाशी विरोधी पोस्ट करु नये. ९)  अश्लिल पोस्ट केल्यास त्याला गृपमधून त्वरीत काढण्यात येईल. १

शिक्षणाची कास आणि ध्यास हिच पीईएसची देणगी: अशोक येरेकर

Image
शिक्षणाची कास आणि ध्यास हिच पीईएसची देणगी: अशोक येरेकर औरंगाबाद - आपण कोण आहोत, आपल्यात काय सामर्थ्य आहे व आपल्यातील ऊर्जा ओळखता आली पाहिजे ते कळणे म्हणजे शिक्षण होय. याच शिक्षणाची कास आणि ध्यास हीच आपल्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची देणगी होय.असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अशोक येरेकर यांनी सोसायटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त बोलतांना केले. नुकताच ८ जुलै रोजी पी.ई.एस.एज्युकेशन सोसायटीचा ७८ वा वर्धापन दिन सोहळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्या डॉ.वैशाली प्रधान, प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, प्राचार्य डॉ.विनायक खिल्लारे, प्राचार्य डॉ.शिवाजी सूर्यवंशी व डॉ.अच्युतराव मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी प्रमूख पाहुणे म्हणून पुढें बोलतांना येरेकर "शिक्षणास नैतिकतेचे महत्व आपण ओळखले पाहिजे.  मिलिंद विद्यार्थी व नागसेन शिक्षक म्हणून आपले योगदान काय ? पालक म्हणून आपण आपल्या बहिणीसाठी व मुलींसाठी वर संशोधन करतांना किती काळजी घेते. त्याचप्रमाणे देशाचे भवितव्य ठरवतांना मतदार म्हणून डॉ. बाबासाहेब